-- end="" ms="" clarity="" --=""> -->
- Raj Bhatia
(Mumbai Edition)
मुंबईत मराठी जेवणाचा विषय निघाला की आपल्या डोक्यात लगेच मिसळ, वडापाव किंवा पुरणपोळी येतं. Classic scene, no doubt! पण जर थोडं deep-dive केलं ना, तर ही स्टोरी खूपच bigger आणि रंजक आहे.
जुन्या खानावळी, लहान-मोठी उपाहारगृहं, फराळाची दुकानं, घरगुती जेवण देणारे स्पॉट्स आणि आता आपल्या जनरेशनसाठी सुरू झालेले न्यू-एज रेस्टॉरंट्स—या सगळ्यांनी मिळून मुंबईत एक भन्नाट शाकाहारी मराठी फूड कल्चर आणि युनिक वाइब तयार केली आहे.
हा फूड ट्रेल गिरगावच्या आयकॉनिक गल्ल्यांपासून सुरू होतो आणि आज दादर, विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई ते थेट पनवेलपर्यंत पोहोचलेला आहे. South Mumbai ते Western Line, Central, Harbour आणि बाहेरचा belt—मॅप ऑलमोस्ट कव्हर झालाय. (वसई-विरार पट्ट्यात अजून solid मराठी वेज स्पॉट्सचा प्रेझन्स थोडा कमी आहे, पण तो बेल्टसुद्धा हळूहळू ग्रो होतोय.)

मुंबईत प्रॉपर होमस्टाईल महाराष्ट्रीयन वेज फूडला खरी ओळख मिळाली ती गिरगावात.
१९०८ मध्ये ठाकूरद्वारमध्ये माधवाश्रम सुरू झालं, जिथून घरच्या पद्धतीच्या जेवणाची परंपरा सुरू झाली आणि ती पुढे गिरगावच्या फूड आयडेंटिटीचा मेन पार्ट बनली.
१९२१ मध्ये गिरगावात पणशीकर ची सुरुवात झाली. सुरुवातीला मसाला दूध, फराळी मिसळ आणि पियुष फेमस होतं. नंतर कोथिंबीर वडी, अळू वडी, थालीपीठ, फराळ आणि मिठाया ॲड झाल्या. आज शतकभरानंतरही गिरगावसह संपूर्ण मुंबईत त्यांचा स्ट्रॉन्ग प्रेझन्स आहे.
१९४० मध्ये आलेलं विनय हेल्थ होम आजही पुणेरी मिसळ, पातळ उसळ, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, पुरणपोळी आणि पियुषसाठी सुपर पॉप्युलर आहे. यांची तिसरी जनरेशन सध्या हे रेस्टॉरंट चालवतेय—जुन्या चवींचा हा आजही एक व्हेरी स्ट्रॉन्ग ॲड्रेस आहे.
पण गिरगावची ही स्टोरी फक्त जुन्या आठवणींपुरती थांबलेली नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये आलेलं The Girgaum Kitchen ही या कल्चरची एक कडक स्टोरी आहे. मूळची १९३० मधील ९५ वर्षे जुनी 'प्रकाश कोल्ड ड्रिंक हाऊस'ची जागा ओंकार नार्वेकर, भारत गोठोसकर आणि हिरेन वेलिंग यांनी एका फुल-फ्लेज्ड वेज रेस्टॉरंटमध्ये ट्रान्सफॉर्म केली. दडपे पोहे, कोथिंबीर वडी, मिसळ, आंबोळी-उसळ, कोकणी थाळी, मेतकूट भात आणि वरण-भात-तूप अशा विसरल्या गेलेल्या रेसिपीजला जुन्या वास्तूची मेमरी रिटेन करून एका कंटेंपररी फॉरमॅटमध्ये सादर करण्याचं काम यांनी केलंय.
गिरगावातून ही गाडी पुढे दादरमध्ये येते—जे खऱ्या अर्थाने या खाद्यसंस्कृतीचं मुख्य केंद्र मानलं जातं.
१९१० मध्ये फक्त १५ सीट्सने सुरू झालेलं मामा काणे आज ११५+ वर्षांनंतरही चौथी जनरेशन चालवतेय, जिथली राईस प्लेट आणि बटाटा वडा ऑल-टाईम फेव्हरेट आहे.
१९७१ मध्ये उभं राहिलेलं प्रकाश उपाहारगृह आजही साबुदाणा वडा आणि पियुषसाठी प्रसिद्ध आहे. आजही वीकेंडला 'प्रकाश'बाहेर असणारी गर्दी पाहिल्यावर समजतं हे फूड कल्चर किती अलाइव्ह आहे. पुढे जाऊन आस्वादसारख्या स्पॉट्सने याच पारंपरिक जेवणाला थोडा मॉडर्न आणि कम्फर्टेबल टच दिला.
दादरच्या पुढे जेव्हा हा प्रवास उपनगरांमध्ये सरकला, तेव्हा प्रत्येक भागाची एक वेगळी फूड आयडेंटिटी तयार झाली.
मुंबईबाहेर जेव्हा शहर पसरू लागलं, तेव्हा नवी मुंबई आणि पनवेलने या मराठी वेज फूड सीनला एका वेगळ्याच लेव्हलवर नेलं.
ही फक्त हॉटेल्सची किंवा खाण्याच्या ठिकाणांची यादी नाहीये, तर ही मुंबईत शतकभरापेक्षा जास्त काळ जपलेली एक जिवंत खाद्यसंस्कृती आहे.
१९०८ मध्ये गिरगावातील एका लहानशा खानावळीतून सुरू झालेला हा प्रवास आज नवी मुंबई अन् पनवेलच्या गजबजलेल्या टेबल्सपर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचला आहे. शहर बदललं, नकाशे बदलले आणि ट्रेंड्स बदलले—पण गिरगावच्या पियुषची चव, दादरच्या साबुदाणा वड्याचा क्रिस्पीपणा आणि ठाणे-पनवेलच्या मिसळीचा तोच झणझणीतपणा आजही कायम आहे.
फास्ट फूड आणि जागतिक ब्रँड्सच्या गर्दीतही, ही अस्सल मराठी चव आजही मुंबईकरांसाठी तितकीच खास आणि जवळची राहिली आहे