एखादे पुस्तक वाचावे अन् त्या पुस्तकाने कायम मनात घर करावे.कितीदा वाचले तरी नव्याने कळावे असे पुस्तक मी पुन्हा वाचले .खरंच सांगते त्या पुस्तकाच्या मी पुन्हा प्रेमात पडले.हे पुस्तक म्हणजे कृष्ममेघ कुंटेंनी लिहलेले"एका रानवेड्याची शोधयात्रा "हे पुस्तक होय.
प्राध्यापक मिलिंद वाटवे आपल्या संशोधनात मदत होईल अन् नापास झाल्या मुळे वाया गेलेले वर्ष सत्कारणी लागेल ह्या उद्देशानी कृष्णमेघला मदुमलाईच्या दाट जंगलात पाठवतात. हत्तीची लीद अन् त्यावर संशोधन हा विषय. तब्बल एक वर्ष जंगलात! वाचताना जंगलाचे सौंदर्य मोहात पाडते. तर रात्रीचे जंगल भयाण वाटते.
हे सगळेच इतक्या सहज ,सुंदर भाषेत लिहले आहे की आपणही ह्या वेगळ्या शोधयात्रेचा एक भाग आहोत हे वाटायला लागतं.
सौ.नीरजा बोधनकर